लहान मुलांच्या आयुष्यातील महत्वाची 9 वर्ष जी घडवतील एक समृद्ध व्यक्तिमत्व, हस्ताक्षराच्या साहाय्याने!
तुम्हाला माहीत आहे का? मुलांना साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून अक्षर ओळख होते आणि मुलांच्या अचेतन मनाचा प्रभाव 12 ते 13 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे या 9 वर्षाच्या कालावधीत अचेतन मनात प्रोग्रामिगसाठी खूप महत्वाचा आहे. मागील ब्लॉगमध्ये तुम्ही वाचले असेलच की शाळेत शिक्षक सगळ्यांना एक सारखच लिहायला शिकवतात पण प्रत्येक मुलाचे लेखन हे एकमेकांपेक्षा वेगळे असते. कारण बऱ्याच अंशी जेव्हा मुलांना लहानपणी लिहिण्याकरीता पाटी/ पेपर आणि पेन्सिल दिली गेली आणि कसे लिहायचे हे शिकवले गेले, तेंव्हा सराव करण्याकरिता त्यांच्यावर कोणतेही नियम नव्हते. जी सर्वात सोयीस्कर पद्धत वाटू लागली तसे त्या मुलांनी लिहायला सुरुवात केली. आजच युग जरी डिजिटल युग होत आहे असे म्हंटले, तरी मुलांचे संगोपन आणि शैक्षणिक प्रगतीत लेखन महत्वाची भूमिका बजावते. सुंदर अक्षर मुलांचे हस्ताक्षर हे नेहेमीच पालक आणि शिक्षकांच्या चर्चेचे विषय होते आणि पुढेही राहतील. मुलांच्या शाळेतील त्यांची शैक्षणीक प्रगतीत त्यांचे चांगले, वळणदार आणि सुस्पष्ट लिखाण हे नेहमीच अग्रस्थानी असते. नीटनेटके, सुटसुटीत आणि सुवाच्य ले...